'क्रांतिज्योती'काव्य संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

 नायगावांत 'क्रांतिज्योती'काव्य संग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह  प्रकाशन सोहळा संपन्न

काव्य संग्रहात महाराष्ट्रातील एकूण १०९ कवींच्या कवितांचा सहभाग

खंडाळा -नायगांव ता.खंडाळा येथे "क्रांतिज्योती" या काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सव स्मृती वर्ष साजरे होत आहे. सावित्रीमाईच्या प्रत्येक पैलूंचा अभ्यासपूर्वक प्रसार होत आहे.त्यांच्या लेखन ,कविता व साहित्यिक पैलू फारसा समाजासमोर  आलेला नाही.या १२५ स्मृतिदिनानिमित्त एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला.  यासाठी सुजन फौंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले या विषयावर काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले.राज्यभरातून एकशे नऊ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव येथे क्रांतिज्योती संपादित काव्यसंग्रह प्रकाशन करून या कवितातूनच सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह  प्रकाशन सोहळा संपन्न

                                हा कार्यक्रम संपन्न होत असताना नायगांवच्या सरपंच पूनम राजेंद्र नेवसे,राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राज्य समन्वयक दिपालीताई पांढरे, महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरीताई धाडगे,सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समितीच्या अध्यक्षा सुनंदा जाधव, युवा माळी संघटनेच्या सुनीता भगत,समता परिषदेच्या पुणे शहराध्यक्षा गौरी पिंगळे, पिंपरी चिंचवडच्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर खंडाळा पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी नेवसे,नायगांव ग्रामपंचायत सदस्य साधना नेवसे,वैशाली नेवसे माजी ग्रामपंचायत सदस्य ,सीमा एकतपुरे, दैनिक तरुण भारतचे सातारा उपसंपादक सुधीर जाधव, पल्लवी मारकड, मीनल कुडाळकर, मंदाकिनी सपकाळ तासगाव,संदीप ननावरे, सुनील रासकर, किशोर ननावरे, सुभाष गोवेकर, गणेश भोसले, रुपाली नेवसे, जयश्री जमदाडे ,सुवर्णा पळशीकर , सुप्रिया नेवसे, मंगल कुंभार, मंदाकिनी नेवसे आदी उपस्थित होते.यावेळी काव्यसंमेलन संपन्न होत असताना या काव्य संमेलनाचे अध्यक्षपद कवि किशोर धरपडे यांनी भूषविले.तसेच विजेते कवी यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम ही संपन्न करण्यात आला.

वनिता बनकर (बारामती) यांना सावित्रीबाई फुले सामाजिक पुरस्काराने व सुनीता इंगळे (कोपरगाव) यांना सावित्रीबाई फुले शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक मंचचे संस्थापक तुकाराम कोकाटे यांचे विशेष सहकार्य लाभले.तसेच नायगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.या काव्य संग्रहाचे संपादक म्हणून रोहिणी रासकर, ज तु गार्डे,अजित जाधव यांनी कामकाज पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज.तू.गार्डे यांनी केले आभार नायगाव पोलीस पाटील माधुरी नेवसे यांनी मानले.

           "क्रांतिज्योती" काव्यलेखन  स्पर्धेतील विजेत्यांची नावे

प्रथम क्रमांक अनिता दिलीपकुमार कांबळे (ठाणे) व योगिता राजेश मापारी (सातारा) यांना देण्यात आला.द्वितीय क्रमांक व्ही.एच. भागवत (विटा) व अहिल्या कृष्णात भोजणे (फलटण), तुतीय क्रमांक डॉ. सौ.निलम गायकवाड (राजगुरूनगर) व सुधा शंकर चौधरी (गडचिरोली)  उत्तेजनार्थ म्हणून मधूश्री दिलीप ओव्हाळ,
श्रीकांत कांबळे, शुभांगी गायकवाड,दत्ताहरी एकनाथराव कदम, मिता नानवटकर, मंदाकिनी दत्तात्रय सपकाळ,योगिनी नागटिळक, प्रीती गायकवाड,अंजली गोडसे,रुपाली नेवसे-बोरावके, दीपक क्षीरसागर,मेधा टिळेकर, सिंधुसूत, प्रीतफुल,वसुधा येनकर, अनिलकुमार शहारे, सीमा एकतपुरे तसेच विशेष उत्तेजनार्थ विद्या सरतापे, मीनल कुडाळकर,गजानन पिसे आदींना सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रम क्षणचित्रे

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह

'क्रांतिज्योती'काव्य संग्रह

 

Comments

  1. मी ल. खं. चौधरी गुरुजी सुरत.
    भारतात सर्वप्रथम महिलांना शिक्षणाची सोय, स्वतः सावित्रीबाई फुले जी, फातिमा शेख जी, सगुणाबाई क्षीरसागर यांनी करून दिली. त्याचबरोबर ज्या मुली तसेच त्यांचे पालक शिक्षण कार्यास तयार झाले होते! त्यांना ही विनम्र अभिवादन.
    आज सुजाण फाऊंडेशनचे संस्थापक संचालकांनी माई सावित्रीबाई फुले जीं च्या अलौकिक,अद्वितीय,असामान्य कर्तृत्वाची अस्मिता आणि अप्रतिम शान, १२५ व्यावर्ष
    निमित्त "कविता" संग्रह ,जाहीर सामाजिक माध्यमातून कविता मागवून कविता संग्रह प्रसिद्ध केला! त्याबद्दल सर्व सहकारी बंधू भगिनीं आणि संपादन करणारे महानुभव या सर्वांना अंतःकरणापासून हार्दिक शुभेच्छा स्वीकाराव्या.महात्मा फुलेजी आणि माई सावित्रीबाई फुले जीं चे चिरस्मरणीय कार्य पृथ्वीतलावर चिरंजीव राहील. महान विभूतींना नतमस्तक नमन.जय ज्योती जय क्रांती.
    ८/३/२०२२ जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीकाराव्या.

    ReplyDelete
  2. असे पुस्तक प्रकाशन सोहळे वारंवार व्हायला हवेत....संपादनाचे काम करणाऱ्या रासकर मॅडम, जाधव सर आणि ज तू गार्डे सर यांचे विशेष करून अभिनंदन तसेच या काव्य प्रकाशनासाठी स्वरचित कविता लिहिणाऱ्या सर्वांचेच खूप खूप अभिनंदन.....

    ReplyDelete

Post a Comment